मंत्र्यांची घोषणा मुळे समाज मध्ये गृहनिर्माण संस्थांचें स्थैर्य आणि सुरक्षितते धोक्यात!

Date:

Share post:

मंत्र्यांची घोषणा मुळे समाज मध्ये गृहनिर्माण संस्थांचें स्थैर्य आणि सुरक्षितते धोक्यात!

“अंजान भाडेकरू यांना सोसायटी एन ओ सी ची आवश्यकता नाही!” — मंत्र्यांची घोषणा मुळे समाज मध्ये सुरक्षिततेला मोठ्या धोखा होण्यारा सक्यता !

हरिष प्रभू,
समाज विकास संवाद,
महाराष्ट्र,

 

मंत्र्यांची घोषणा मुळे समाज मध्ये गृहनिर्माण संस्थांचें स्थैर्य आणि सुरक्षितते धोक्यात, अंजान भाडेकरू यांना सोसायटी एन ओ सी ची आवश्यकता नाही- मंत्र्यांची घोषणा मुळे समाज मध्ये सुरक्षिततेला मोठ्या धोखा होण्यारा सक्यता, ना हरकत प्रमाणपत्रामुळे गृहनिर्माण संस्थांमधले गैरव्यवहारांना लगाम राहते!

२०१४ च्या सहकार कायद्यात अशा प्रकारची तरतूद यापूर्वीच अस्तित्वात आहे,

परंतु गृहनिर्माण संस्थांच्या व्यापक हिताच्यादृष्टीने ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यकच ठरते.

कारण घर विकताना किंवा भाड्याने देताना संबंधित घरमालकाकडे जर थकबाकी असेल तर ती वसुल करण्याचा अधिकार यानिमित्ताने गृहनिर्माण संस्थेकडे राहातो.

शिवाय गृहनिर्माण संस्थेच्या सुरक्षिततेसाठीसुध्दा ही बाब आवश्यक ठरते.

तिथे येणारी नवीन व्यक्ती किंवा भाड्याने राहाणारा भाडेकरू कोण आहे.

त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ना या सगळ्या गोष्टींचा इतर सभासदांच्या सुरक्षिततेसाठी करावा लागतो,

अशा अनेक दृष्टीकोनातून ही एनओसी गरजेची असताना त्याला एकदम हद्दपार करण्याची मंत्र्यांची घोषणा सुस्थ समाज साठी फारशी हितकारक नाही.

 

 

समाज मध्ये गृहनिर्माण संस्थांचें स्थैर्य आणि सुरक्षितते!

ना हरकत प्रमाणपत्रामुळे गृहनिर्माण संस्थांमधले गैरव्यवहारांना लगाम राहते!

ना हरकत प्रमाणपत्रामुळे गृहनिर्माण संस्थांमधले गैरव्यवहारांना लगाम राहते!

उलट या ना हरकत प्रमाणपत्रामुळे गृहनिर्माण संस्थांमधले गैरव्यवहार टळू शकतात.

मनमानीला चाप बसू शकतो.

म्हणजे जो सहकार कायदा एकमेकांच्या सहकारातून समृध्दीची ग्वाही देतो त्या कायद्यातल्या काही तरतूदी केवळ राजकीय कारणामुळे घुसडल्या गेल्या आहेत की काय असे वाटायला लागते.

महाराष्ट्रामध्ये आज लाखापेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था आहेत.

त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले काही कायदे या संस्थांच्या व्यवस्थापनाकरीता पूरक ठरलेले आहेत.

अनेकवेळेला सदनिकांची किंवा घरांची विक्री करण्यासाठीच एनओसी लागते असे नाही तर,

अगदी गॅस पाईपलाईन घ्यायची असेल, विजेचे कनेक्शन घ्यायचे असेल.

किंवा बँकांमधून कुठला कर्जव्यवहार करायचा असेल तर सोसायटीची एनओसी खूप महत्वपूर्ण समजली जाते.

जर हा एनओसीचा अधिकार काढून घेतला किंवा त्याच्यावर गदा आणली.

 

सुरक्षिततेच्या कारणामुळे घर भाड्याने देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी लागते!

सुरक्षिततेच्या कारणामुळे घर भाड्याने देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी लागते

तर बरेच मोठे आर्थिक गैरव्यवहारही होऊ शकतात.

अनेक घर ही गहाण ठेवलेली असतात त्याच्यावर काही कर्ज घेतलेली असतात.

त्याची परतफेड जर संबंधित घरमालकाने केली नसेल आणि नव्याने घर घेणारी व्यक्ती त्याबाबत अंधारात असेल तर त्याचा बोजा किंवा त्रास त्या गृहनिर्माण संस्थेला होऊ शकतो.

शिवाय ज्याने घर घेतले आहे त्याचीदेखील मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते.

अशा कर्जव्यवहारांची आणि त्या त्या सदस्यांची माहिती गृहनिर्माण संस्थेकडे असते.

त्यावेळी संबंधितांना सावध करण्याचे काम या संस्था करू शकतात.

अन्यथा एकेका घरावर दोनदोनदा कर्ज घेण्याचे प्रकारही घडून येतात.

सध्या तर सुरक्षिततेच्या कारणामुळे घर भाड्याने देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी लागते.

आणि पोलिसांचेही ना हरकत पत्र आणावे लागते.

जर पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक मानले जाते तर मग सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राला आक्षेप का घेतला जातो.

 

 

“सहकारी गृहनिर्माण संस्थाचा कारभार हा राज्याच्या गृहनिर्माण खात्याच्या अंतर्गत येत नाही”- गृहनिर्माण मंत्र्यांनी असे विधान करणे हे म्हणणेदेखील चुकीचे!

 

सहकारी गृहनिर्माण संस्थाचा कारभार हा राज्याच्या गृहनिर्माण खात्याच्या अंतर्गत येत नाही”- गृहनिर्माण मंत्र्यांनी असे विधान करणे हे म्हणणेदेखील चुकीचे!

याचा अर्थ गृहनिर्माण संस्थांमध्ये घुसखोरी करणारे काही लोक आपला दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असावेत काढून किंवा,

या एका एनओसीच्या या अटीमुळे त्यांच्या दादागिरीला आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांनाही लगाम बसला असावा.

ही अडचण दूर करण्यासाठीच ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही असे विधान जाहीररित्या गृहनिर्माण मंत्र्यांना करावे लागले असे दिसते. कमकुवत करू नका.

“सहकारी गृहनिर्माण संस्थाचा कारभार हा राज्याच्या गृहनिर्माण खात्याच्या अंतर्गत येत नाही”-

म्हणून गृहनिर्माण मंत्र्यांनी असे विधान करणे हे म्हणणेदेखील चुकीचे ठरतयाचा दुसरा अर्थ असा होतो की;

अधिकारात येत असताना आणि कोणतीही आता गरज नसताना सहकार क्षेत्रातली ही राजकीय लुडबुड अनाठायी केली गेलेली दिसते.

 

आज गृहनिर्माण संस्थांमुळे सरकारचा कितीतरी त्रास कमी झालेला आहे.

खरे तर आज गृहनिर्माण संस्थांमुळे सरकारचा कितीतरी त्रास कमी झालेला आहे.

लाखो लोकांना घरासोबत आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उत्तम पध्दतीने देण्यासाठी या गृहनिर्माण संस्था अतिशय उपयुक्त ठरलेल्या आहेत.

आता तर मोठ्या गृहनिर्माण संस्थांमधून कचऱ्याची विल्हेवाट लावता येते.

पाण्याची बचत करण्यासाठी रेन हार्वेस्टिंगसारखा प्रकारही राबवता येतो आहे.

अनेक मोठ्या संस्थांनी सौरऊर्जेचा वापर करून वीज आणि पैशाचीही बचत केली आहे.

त्या सहकारी संस्थांना अधिकाधिक भक्कम करण्याच्याऐवजी त्यांचे अधिकार काढून कमकुवत करण्याचा हा प्रकार अयोग्यच म्हणावा लागतो.

२०१४ च्या कायद्यात एनओसीसंदर्भात केलेला कायदा रद्द करून सोसायट्यांना एनओसी चा कायदेशीर अधिकार बहाल करण्याची आवश्यकता आहे.

दुर्दैव एवढेच आहे की अशा कारणामुळेच सहकारी पतपेढ्या, सहकारी बँका डबघाईला जाण्याची वेळ येते.

म्हणूनच हे राजकीय हस्तक्षेप थांबवून सहकाराला अधिक बळकटी मिळेल अशा धोरणांचा पाठपुरावा झाला पाहिजे.

 

समाज मध्ये गृहनिर्माण संस्थांचें स्थैर्य आणि सुरक्षितते

परत एकदा – संस्थेच्या ना हरकतीचा आवश्यकता नसेल तर!

संस्थेच्या ना हरकतीचा आवश्यकता नसेल तर

१ ) विक्री करून जाणारा सदस्य संस्थेची सर्व देणी डुबवू शकतो

२) बँक कर्ज घेतले असेल तर बँकेची फसवणूक करू शकतो

३) सदनिकेचा वापर गैरमार्गाकरिता होऊ शकतो, परिणामी अतिरेकी कारवाया होऊ शकतात

४)सहकारी संस्थेमध्ये सौहार्दाचे वातावरण नष्ट होऊ शकते.

५) हा विषय सहकार मंत्र्यांच्या अधिकारात येतो , त्यांच्याऐवजी गृहनिर्माण मंत्र्यांनी यावर बोलणं योग्य नाहीं.

अल्पसंख्याक समाजाला यापासून फार मोठा फायदा होऊ शकतो या शंकेला वाव आहे .

आणि आताचे जे गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांची विचारसरणी, मानसिकता, कार्यपध्दती पाहता हा निर्णय सहकारी गृहनिर्माण संस्थांचे आर्थिक व सामाजिक स्थैर्य नष्ट करणारा आहे.

 


ना हरकत प्रमाणपत्र, समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,

সমাজ, সমাজ বিকাস , সমাজ সংবাদ, বিকাস, বিকাস সংবাদ, সংবাদ, সমাজ বিকাস সংবাদ

Leave a Reply

Related articles

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.

Credit Card Frauds In India on The Rise! What Are The Protective Measures?

Credit Card Frauds In India on The Rise! What Are The Protective Measures? What Are The Types of Credit Card Frauds in India? What are Punishment for Credit Card frauds in India? Where To File The Complaint For Credit Card Frauds In India? What Are The Steps to Report Credit Card Frauds in India? Tips to Avoid Credit Card Frauds in India!

क्या है आर्थिक रूप से पिछरा वर्ग की आरक्षण ? ई डब्ल्यू एस आरक्षण का लाभ किसे और कैसे मिलेगा ?

क्या है आर्थिक रूप से पिछरा वर्ग की आरक्षण ?   ई डब्ल्यू एस आरक्षण का लाभ किसे और कैसे मिलेगा ?केंद्र में नरेन्द्र मोदी सरकार की एक ऐतिहासिक फैसले को न्यायिक वैधता देते हुएभारत की सर्वोच्च न्यायालय ने आर्थिक रूप से कमजोर वर्गों अर्थात ई डब्ल्यू एस आरक्षण को न्यायिक मान्यता दिया!सुप्रीम कोर्ट की पांच-न्यायाधीशों की पीठ ने सोमवार को 3-2 के फैसले में सरकारी नौकरियों औरशैक्षणिक संस्थानों में आर्थिक रूप से कमजोर वर्गों (ई डब्ल्यू एस) के लिए 10% आरक्षण की वैधता को बरकरार रखा।